- VS Gaitonde
- Ram Kumar
- Akbar Padamsee
- Amrita Sher-Gil
- Vanita Gupta
- Smita Kinkale
- Ratnadeep Adivrekar
- Tathi Premchand
- Nilesh Kinkale
- Prabhakar Kolte
- Chintan Upadhyay
- Prabhakar Barwe
- Shankar Palsikar
- Yashwant Deshmukh
- Prabhakar Kolte
- Sanchita Sharma
- Prakash Waghmare
- Ranjit Hoskote
- Premjish Achari
- Pankaja JK
- Contact
Friday 28 February 2014
Thursday 27 February 2014
पाहून रंगवण्याऐवजी रंगवून पाहिलं!
खरं म्हणजे, दृश्य प्रवासात
पुढे, मागे, वर, खाली असं काही नसतंच. असतो फक्त स्वानुभव, प्रवाशाला
समृद्ध करणारा आणि तो मला अनुभवता आला, पळशीकरसरांच्या सान्निध्यात असताना,
जीवनात आलेल्या वळणामुळे!.. आयुष्यातल्या वळणाला उजाळा देत आहेत, प्रसिद्ध
चित्रकार प्रभाकर कोलते...
वळणं तर आयुष्यात अनेक आली, काही मी स्वत:च घेतली. त्यातल्या काहींनी जीवनाला वळण लावलं तर, काही वळणांना मी माझ्या मनाप्रमाणे आळवलं, वळवलं. काही वळणांनी आकार दिला, अर्थ दिला. परंतु एका अकस्मात वळणाने मला माझ्यातच गुंतवलं. मला माझी ओळख करून दिली. माझीच माझ्याशी भेट घालून दिली, कायमची. 'वळणावर आंब्याचे झाड एक रसाळले' असं म्हणण्यासारखा दृक- रसज्ञतेचा दृष्टांत ह्या संबंधित वळणाने मला दिला, जो उत्तरोत्तर गुणावत गेला आणि मला समाधान देणारा ठरला.
................
जे. जे. कलाशाळेतील अंतिम वर्षातले झपाट्याने सरत जाणारे दिवस. एक पाऊल शाळेत, तर दुसरं बाहेर अशी दुभंगलेली मन:स्थिती. अंतिम परीक्षेपूर्वीची परीक्षा म्हणजे वार्षिक प्रदर्शन, ते तोंडावर आलेले. प्रत्येकाच्या देहबोलीतून बोलणारा आंतरिक तणाव. सगळे गुप्तपणे आपापल्या कला-कर्मात रत. आपल्याच उजव्या हाताचे डाव्या हाताला कळू न देण्याचे प्रत्येकाचे धोरण, मग इतर कोण काय करतो हे कळणे म्हणजे चक्रव्यूह भेदण्यासारखेच!
कोणाला गोल्ड-मेडल मिळणार याचे अंदाज दही-हंडीच्या थरासारखे बांधले जात आणि झपाट्याने कोसळत. माझेही नाव त्या थरात असल्याचं कानावर येई आणि मनात दिवसा उजेडी कारंजी फुटत. मग म्हणता म्हणता वार्षिकोत्सवाचा पहिला दिवस उजाडला.
काशिनाथ साळवेला गोल्ड, मला सिल्वर घोषित झालं. गोल्ड नंतरच्या दु:खापेक्षा ब्राँझ आधीचा आनंद गो(ल)ड मानून घेतला. दिवस उलटत गेले तसतसा आनंदही अस्ताला गेला आणि अस्मादिक पुन्हा सत्यसृष्टीत आले.
मनात विचार आला, काय झालं असतं गोल्ड मिळालं असतं तर आणि काय होणार आहे सिल्वर मिळालं म्हणून! आतून उत्तर येण्याइतकं शहाणपण तेव्हा आलं नव्हतं, म्हणून मग गप्प राहून जे समोर येईल ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मला न शोभणारा संयम माझ्यात कुठून आला कोण जाणे? कुठून का होईना, पण तो आला. मी चक्क निर्ढावलो आणि शांत झालो.
साळवे आणि मी घनिष्ट मित्र होतो. त्यामुळे एकमेकाला हसत-खेळत सामोरे जात पदरी पडलेलं यश आम्ही पचवलं.
...आणि ते, आयुष्याला सुखाने उल्हसित करणारं, दु:खाने गुदमरवून टाकणारं, भविष्यातल्या आव्हानांनी चेतवणारं आणि भूतकाळातल्या वेदनांनी चित्कारायला लावणारं वळण अंगावर आलं. कसलीही आगाऊ सूचना न देता.
ज्या दिवशी मी शाळेत गेलो नव्हतो, त्याच दिवशी केमोल्ड गॅलरीचे केकू गांधी प्रदर्शन पाहायला आले. त्यांनी माझं पेंटिग विकत घेतलं. वार्षिक प्रदर्शनातून चित्र विकलं जाण्याची ही पहिलीच घटना असं म्हटलं गेलं. तशी ती असो-नसो, माझ्या खिशात पैसे पडणार होते; हे तेव्हाच्या परिस्थितीत फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. परंतु ह्या घटनेचा मला मागमूसही नव्हता. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. मित्रांनी कल्लोळ केला, 'पार्टी दे, तुझं चित्र विकलं गेलं.' मला खरंच वाटेना. वाटलं मित्र थट्टा करताहेत. तर म्हणाले- 'पळशीकरसरांना विचार.' गेलो सरांकडे. त्यांनीही तेच सांगितलं. तरीही खरं वाटेना. मनात आलं, सरही ह्या थट्टेत सामील झाले असावेत. म्हणाले- 'अरे केकुने तुला गॅलरीत बोलावलं आहे, जा, जाऊन ये.' गंभीर प्रकृतीचे सर अशी थट्टा करणं अशक्य अशी मनाची समजूत काढत केकूना भेटायला त्यांच्या गॅलरीत गेलो.
फेब्रुवारी, सन १९६८. दुपारचे तीन वाजले होते. केकू त्यांच्या खुर्चीत, मी त्यांच्यासमोर उभा. माझी ओळख दिली. त्यांनी लगेच २५० रुपयांचा चेक माझ्या हातात देताच मी दिवास्वप्नात विरघळत गेलो. सिल्वर मेडलचं विष अमृत होऊन अंगभर पसरलं. मी ढगात होतो. खाली उतरायची बिलकूल इच्छा नव्हती. तेवढ्यात केकूंचा आवाज कानी पडला- 'कोलते, वुई वुड लाइक टू शो युवर वर्क इन अवर गॅलरी, इन कमिंग मंथ ऑफ मे, विल यू बी इंटरेस्टेड?'
चित्रकार मागतो एक डोळा, गॅलरी देते दोन. चेक, वर एक्झिबिशन! अशी माझी गत झाली. काय उत्तर द्यावं कळेना. म्हटलं, विचार करून सांगतो आणि तिथून बाहेर पडलो. तडक सरांकडे निघालो.
वर्षभरापूर्वी नाटकात काम करण्याच्या, तसंच इतर कलांमध्ये भाग घेण्याच्या माझ्या अतिउत्साहावर कठोर शब्दांत टीका करत सरांनी मला केवळ पेंटिंगच्या दिशेने वळवलं होतं. त्यावेळच्या त्यांच्या निखळ स्पष्टवक्तेपणाचा अनुभव स्मरणात कायम ताजा राहील असाच होता. आणि आता त्यांना अपेक्षित असलेल्या दिशेनेच इतक्या वेगाने व्यावसायिक यश, न मागता, कुठलेही प्रयत्न न करता हाताशी आल्याने मी त्यांच्या दूरदृष्टीचं मनात मनसोक्त कौतुक करत, परत पाऊली शाळेच्या दिशेने निघालो.
सर स्टाफ-रूममध्ये पुस्तक वाचत बसले होते. त्यांना पाहताच माझ्या उत्साहाला निराशेपूर्वीचं उधाण आलं असावं. मी आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांना नमस्कार केला आणि एका दमात केकू-भेटीचा वृतांत कथन करून त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. माझ्या डोळ्यांतून आतुरता भरभरून ओसंडत होती आणि सरही तितक्याच तीव्रतेने गंभीर होत चाललेले दिसत होते. ते काहीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते आणि मीही त्यांच्याकडून काहीच न ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. मला जाणवलं की हीच माझ्या आयुष्यातली आणीबाणीची आणि महत्वाची वेळ आहे आणि सरांच्या सल्ल्याशिवाय ती निसटून जाऊ द्यायची नाही. अशा स्थितीत किती वेळ गेला कळलंच नाही आणि अचानक मी सराना म्हटलं, 'सर तुमच्या सल्ल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही, तेव्हा प्लीज, मला सांगा मी काय उत्तर देऊ केकूना.' तरीही सर गप्पच. सरांच्या ह्या अकल्पित पॉजमुळे माझ्या मनात शंका-कुशंकांचं मोहोळ उठलं. सराना आनंद झाला नाही का?, की सरांचा माझ्यावरचा राग अजूनही शिल्लक आहे? की केमोल्डसारख्या गॅलराने मला शोची ऑफर दिली, हे सरांना आवडलं नाही? विद्यार्थी दशेत असतानाच कुणाला मिळाली आहे अशी संधी? कुठून अवदसा आठवली आणि सरांना सल्ला विचारायला आलो... असे बरेचसे अरबट चरबट कल्पनांचे खेळ डोक्यात सुरु असतानाच सर जागेवरून उठले आणि म्हणाले- 'प्रभाकर, प्रदर्शन म्हणजे आपल्या प्रतिभेचं दर्शन आणि त्यातही ते पहिलंच असेल तर, ते धाडसापेक्षा जबाबदारीचं काम आहे. 'फस्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.' तेंव्हा मी काय म्हणतो ते लक्ष देऊन ऐक आणि मग तुझा तू निर्णय घे.'
ते पुढे म्हणाले 'सांग बरं, तुझं चित्र सापडलंय तुला? तुझ्या चित्रांतून तू थोडासा आणि इतरच अधिक दिसतात- सामंत, हुसेन, रझा, पळशीकर, गायतोंडे, पॉल क्ले. तुझ्या चित्रात तू कुठे आणि किती आहेस हे आधी तू जोखावंस आणि मग ठरवावंस. जा, विचार करून निर्णय घे. घाई करू नकोस. चुकीच्या पायावर उभी राहिलेली इमारत कोसळायला वेळ लागत नाही.'
म्हणजे जबाबदारीचं काम थोडंसं हलकं करण्याऐवजी माझा माझ्यातच कडेलोट करून सर निघून गेले, मला एकटं सोडून. मी निराश झालो खरा, पण सरांनी मला विचार करायला भाग पाडलं. माझा पुरता गोंधळ उडाला.
नंतरचे मोजून आठ दिवस शाळेतच गेलो नाही. दररोज माझी सगळी चित्र पोर्टफोलियोतून काढून जमिनीवर मांडायचो. कधी ती उलटी-सुलटी ठेवून, तर कधी एक एक करून पाहायचो. त्यावरल्या प्रभावांचं मनाशी विश्लेषण करायचो. हे असं सातत्याने केल्यामुळे सरांचं म्हणणं हळूहळू मनात रिघायला लागलं. खरंच, चित्र आहेत, पण मी कुठे आहे त्यात, शिवाय किती आहे. कसं ओळखायचं स्वत:ला. काही कळायचं नाही. काय आहेत या शोधाचे निकष, ज्यांचे प्रभाव जाणवतात त्या चित्रकारांची चित्रे त्यांचीच वाटतात, ती कशामुळे इ.इ. प्रश्न मनात यायचे. त्या अथक प्रयासात डोकं, मन, बुद्धी, त्या अलीकडचे आणि पलीकडचे सारे दिगंत बधीर झाले. अत्यंत निराश झालो. हाती काही आलं नसलं तरी आपण चुकीचा मार्ग निवडला आहे, असं चुकूनही वाटलं नाही, ही त्या शोधातली जमेची बाजू. दरम्यान, जे मनापासून आवडतं तेच तू करतो आहेस, असं माझं मन मला सांगत राहिलं. मग त्या आवडीवरच लक्ष केंद्रित करून चिंतन करू लागलो आणि मनात प्रत्यन्तराची वीज चमकून गेली. वाटलं जे माझं होतं, ते माझ्यातच हरवलं होतं आणि मी ते बाहेर शोधत होतो. अभ्यास आणि व्यासंग यांमधील नातं आणि परस्परविरोधी दिशा लक्षात आल्या.
......
बरेच दिवस चित्रासंबंधी काहीच केलं नाही. त्याऐवजी गोनीदांची 'कुणा एकाची भ्रमणगाथा', पु. शि. रेगे यांची 'सावित्री', 'पुष्कळा' ही पुस्तकं वाचली. सिनेमे पाहिले. सोबत संगीत होतंच. मनावर कुठलंही ओझं न घेता मुंबईतच भरपूर प्रवास केला. थोडक्यात चित्र सोडून इतर सर्व काही केलं. आम्ही एक लॉन्ड्री चालवायला घेतली होती. तिथे बसू लागलो. त्यामुळे लोकांशी, कपड्यांशी संपर्क घडला, जो माझ्यासाठी नवा होता. त्यातून माझ्या चित्रात काय येणार होतं, माहीत नव्हतं. सगळं जगणं निश्चित-अनिश्चित नि विक्षिप्त होत चाललं होतं, परंतु मी स्वत:च्या आणि माझ्या चित्राच्या जवळ येत असल्याची आंतरिक जाणीव स्पष्ट होत होती.
ही आनंद व्यक्त करण्याची नव्हे, तर स्वत:ची परीक्षा घेण्याची वेळ होती हे लक्षात आलं आणि मी परीक्षेला बसलो. मीच परीक्षार्थी आणि मीच परीक्षक. शाळेत जे-जे शिकलो त्याचं मर्म लक्षात ठेऊन बाकीचं सर्व स्मृतीतून पुसून टाकण्याचा प्रयत्न चित्रातून जारी ठेवला, कारण तो निव्वळ अभ्यास होता. दिसणं, पाहणं, निरखणं आणि दृष्टीपटलावर बिम्बवणं ह्यातला मुलभूत भेद स्पष्ट करणारा. चित्राचे घटक आणि त्यांचं सृष्टीतल्या अनेकविध रूपांशी असणारं अंतस्थ, अदृश्य नातं सांगणारा. केवळ वरवरची वस्तुनिष्ठ यंत्रवत्, तांत्रिक कारागिरी आणखी सुधारून मला चित्रांतून मांडायची नव्हती. तर त्या अभ्यासाच्या जोरावर मनातल्या दृश्याविषयीच्या अदृश्य विचाराला त्यातल्या निखळ अनुबंधाला उत्स्फूर्तपणे आणि सहजपणे व्यक्त करायचं होतं. आशयाला रूप द्यायचं होतं. अनोळखी अनुभवांना ओळख देण्याची दुर्दम्य इच्छा होती. दृष्टीआड लपलेल्या सृष्टीला साकारणं हाच माझ्या सृजन-क्रियेचा केंद्रबिंदू आहे, हे तीव्रतेनं जाणवत होतं आणि म्हणूनच 'पाहून रंगवण्या ऐवजी, रंगवून पाहण्याची' जिगीषा मी अनुभवू इच्छित होतो. ह्या तीव्र इच्छेनेच मला एका अद्भुत वळणावर आणून उभं केलं होतं.
मला माझं चित्र सापडलं होतं, कारण मला मी सापडलो होतो. १९६८ साली शो-ची ऑफर देणाऱ्या केकूनी मला पुन्हा १९७८ साली विचारलं, त्यावेळीही मी त्यांना नकार दिला. कारण मी माझ्या 'फस्ट इम्प्रेशन' बद्दल अधिक जागरूक आणि जबाबदार झालो होतो. १९८३ साली मात्र मी माझं पहिलंवहिलं प्रदर्शन त्यांच्याच गॅलरीमध्ये भरवलं आणि कलाजगताने त्याचं स्वागत केलं. मला घडविणाऱ्या पळशीकरसरांनीच प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. खरंच माझ्या सरांनी त्या वेळी परखड उपदेश केला नसता, तर मी आज कुठे असतो? त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चाललो नसतो, तर माझ्या वैचारिक प्रवासाचं काय झालं असतं? मला माहीत आहे, मी असूनही नसतोच.
असं हे मूलभूत वळण घेऊन मी आता खूप पुढे निघून आलो आहे. खरं म्हणजे, दृश्य प्रवासात पुढे, मागे, वर, खाली असं काही नसतं. असतो फक्त स्वानुभव, प्रवाशाला समृद्ध करणारा. तो मला अनुभवता आला, सरांच्या सान्निध्यात, जीवनात आलेल्या वळणामुळे!
(Report courtesy महाराष्ट्र टाइम्स) Feb 2, 2014, 12.00AM
वळणं तर आयुष्यात अनेक आली, काही मी स्वत:च घेतली. त्यातल्या काहींनी जीवनाला वळण लावलं तर, काही वळणांना मी माझ्या मनाप्रमाणे आळवलं, वळवलं. काही वळणांनी आकार दिला, अर्थ दिला. परंतु एका अकस्मात वळणाने मला माझ्यातच गुंतवलं. मला माझी ओळख करून दिली. माझीच माझ्याशी भेट घालून दिली, कायमची. 'वळणावर आंब्याचे झाड एक रसाळले' असं म्हणण्यासारखा दृक- रसज्ञतेचा दृष्टांत ह्या संबंधित वळणाने मला दिला, जो उत्तरोत्तर गुणावत गेला आणि मला समाधान देणारा ठरला.
................
जे. जे. कलाशाळेतील अंतिम वर्षातले झपाट्याने सरत जाणारे दिवस. एक पाऊल शाळेत, तर दुसरं बाहेर अशी दुभंगलेली मन:स्थिती. अंतिम परीक्षेपूर्वीची परीक्षा म्हणजे वार्षिक प्रदर्शन, ते तोंडावर आलेले. प्रत्येकाच्या देहबोलीतून बोलणारा आंतरिक तणाव. सगळे गुप्तपणे आपापल्या कला-कर्मात रत. आपल्याच उजव्या हाताचे डाव्या हाताला कळू न देण्याचे प्रत्येकाचे धोरण, मग इतर कोण काय करतो हे कळणे म्हणजे चक्रव्यूह भेदण्यासारखेच!
कोणाला गोल्ड-मेडल मिळणार याचे अंदाज दही-हंडीच्या थरासारखे बांधले जात आणि झपाट्याने कोसळत. माझेही नाव त्या थरात असल्याचं कानावर येई आणि मनात दिवसा उजेडी कारंजी फुटत. मग म्हणता म्हणता वार्षिकोत्सवाचा पहिला दिवस उजाडला.
काशिनाथ साळवेला गोल्ड, मला सिल्वर घोषित झालं. गोल्ड नंतरच्या दु:खापेक्षा ब्राँझ आधीचा आनंद गो(ल)ड मानून घेतला. दिवस उलटत गेले तसतसा आनंदही अस्ताला गेला आणि अस्मादिक पुन्हा सत्यसृष्टीत आले.
मनात विचार आला, काय झालं असतं गोल्ड मिळालं असतं तर आणि काय होणार आहे सिल्वर मिळालं म्हणून! आतून उत्तर येण्याइतकं शहाणपण तेव्हा आलं नव्हतं, म्हणून मग गप्प राहून जे समोर येईल ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मला न शोभणारा संयम माझ्यात कुठून आला कोण जाणे? कुठून का होईना, पण तो आला. मी चक्क निर्ढावलो आणि शांत झालो.
![]() |
( Work on display. Images for illustrative purposes only) |
साळवे आणि मी घनिष्ट मित्र होतो. त्यामुळे एकमेकाला हसत-खेळत सामोरे जात पदरी पडलेलं यश आम्ही पचवलं.
...आणि ते, आयुष्याला सुखाने उल्हसित करणारं, दु:खाने गुदमरवून टाकणारं, भविष्यातल्या आव्हानांनी चेतवणारं आणि भूतकाळातल्या वेदनांनी चित्कारायला लावणारं वळण अंगावर आलं. कसलीही आगाऊ सूचना न देता.
ज्या दिवशी मी शाळेत गेलो नव्हतो, त्याच दिवशी केमोल्ड गॅलरीचे केकू गांधी प्रदर्शन पाहायला आले. त्यांनी माझं पेंटिग विकत घेतलं. वार्षिक प्रदर्शनातून चित्र विकलं जाण्याची ही पहिलीच घटना असं म्हटलं गेलं. तशी ती असो-नसो, माझ्या खिशात पैसे पडणार होते; हे तेव्हाच्या परिस्थितीत फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. परंतु ह्या घटनेचा मला मागमूसही नव्हता. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. मित्रांनी कल्लोळ केला, 'पार्टी दे, तुझं चित्र विकलं गेलं.' मला खरंच वाटेना. वाटलं मित्र थट्टा करताहेत. तर म्हणाले- 'पळशीकरसरांना विचार.' गेलो सरांकडे. त्यांनीही तेच सांगितलं. तरीही खरं वाटेना. मनात आलं, सरही ह्या थट्टेत सामील झाले असावेत. म्हणाले- 'अरे केकुने तुला गॅलरीत बोलावलं आहे, जा, जाऊन ये.' गंभीर प्रकृतीचे सर अशी थट्टा करणं अशक्य अशी मनाची समजूत काढत केकूना भेटायला त्यांच्या गॅलरीत गेलो.
फेब्रुवारी, सन १९६८. दुपारचे तीन वाजले होते. केकू त्यांच्या खुर्चीत, मी त्यांच्यासमोर उभा. माझी ओळख दिली. त्यांनी लगेच २५० रुपयांचा चेक माझ्या हातात देताच मी दिवास्वप्नात विरघळत गेलो. सिल्वर मेडलचं विष अमृत होऊन अंगभर पसरलं. मी ढगात होतो. खाली उतरायची बिलकूल इच्छा नव्हती. तेवढ्यात केकूंचा आवाज कानी पडला- 'कोलते, वुई वुड लाइक टू शो युवर वर्क इन अवर गॅलरी, इन कमिंग मंथ ऑफ मे, विल यू बी इंटरेस्टेड?'
चित्रकार मागतो एक डोळा, गॅलरी देते दोन. चेक, वर एक्झिबिशन! अशी माझी गत झाली. काय उत्तर द्यावं कळेना. म्हटलं, विचार करून सांगतो आणि तिथून बाहेर पडलो. तडक सरांकडे निघालो.
वर्षभरापूर्वी नाटकात काम करण्याच्या, तसंच इतर कलांमध्ये भाग घेण्याच्या माझ्या अतिउत्साहावर कठोर शब्दांत टीका करत सरांनी मला केवळ पेंटिंगच्या दिशेने वळवलं होतं. त्यावेळच्या त्यांच्या निखळ स्पष्टवक्तेपणाचा अनुभव स्मरणात कायम ताजा राहील असाच होता. आणि आता त्यांना अपेक्षित असलेल्या दिशेनेच इतक्या वेगाने व्यावसायिक यश, न मागता, कुठलेही प्रयत्न न करता हाताशी आल्याने मी त्यांच्या दूरदृष्टीचं मनात मनसोक्त कौतुक करत, परत पाऊली शाळेच्या दिशेने निघालो.
सर स्टाफ-रूममध्ये पुस्तक वाचत बसले होते. त्यांना पाहताच माझ्या उत्साहाला निराशेपूर्वीचं उधाण आलं असावं. मी आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांना नमस्कार केला आणि एका दमात केकू-भेटीचा वृतांत कथन करून त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. माझ्या डोळ्यांतून आतुरता भरभरून ओसंडत होती आणि सरही तितक्याच तीव्रतेने गंभीर होत चाललेले दिसत होते. ते काहीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते आणि मीही त्यांच्याकडून काहीच न ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. मला जाणवलं की हीच माझ्या आयुष्यातली आणीबाणीची आणि महत्वाची वेळ आहे आणि सरांच्या सल्ल्याशिवाय ती निसटून जाऊ द्यायची नाही. अशा स्थितीत किती वेळ गेला कळलंच नाही आणि अचानक मी सराना म्हटलं, 'सर तुमच्या सल्ल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही, तेव्हा प्लीज, मला सांगा मी काय उत्तर देऊ केकूना.' तरीही सर गप्पच. सरांच्या ह्या अकल्पित पॉजमुळे माझ्या मनात शंका-कुशंकांचं मोहोळ उठलं. सराना आनंद झाला नाही का?, की सरांचा माझ्यावरचा राग अजूनही शिल्लक आहे? की केमोल्डसारख्या गॅलराने मला शोची ऑफर दिली, हे सरांना आवडलं नाही? विद्यार्थी दशेत असतानाच कुणाला मिळाली आहे अशी संधी? कुठून अवदसा आठवली आणि सरांना सल्ला विचारायला आलो... असे बरेचसे अरबट चरबट कल्पनांचे खेळ डोक्यात सुरु असतानाच सर जागेवरून उठले आणि म्हणाले- 'प्रभाकर, प्रदर्शन म्हणजे आपल्या प्रतिभेचं दर्शन आणि त्यातही ते पहिलंच असेल तर, ते धाडसापेक्षा जबाबदारीचं काम आहे. 'फस्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.' तेंव्हा मी काय म्हणतो ते लक्ष देऊन ऐक आणि मग तुझा तू निर्णय घे.'
ते पुढे म्हणाले 'सांग बरं, तुझं चित्र सापडलंय तुला? तुझ्या चित्रांतून तू थोडासा आणि इतरच अधिक दिसतात- सामंत, हुसेन, रझा, पळशीकर, गायतोंडे, पॉल क्ले. तुझ्या चित्रात तू कुठे आणि किती आहेस हे आधी तू जोखावंस आणि मग ठरवावंस. जा, विचार करून निर्णय घे. घाई करू नकोस. चुकीच्या पायावर उभी राहिलेली इमारत कोसळायला वेळ लागत नाही.'
म्हणजे जबाबदारीचं काम थोडंसं हलकं करण्याऐवजी माझा माझ्यातच कडेलोट करून सर निघून गेले, मला एकटं सोडून. मी निराश झालो खरा, पण सरांनी मला विचार करायला भाग पाडलं. माझा पुरता गोंधळ उडाला.
नंतरचे मोजून आठ दिवस शाळेतच गेलो नाही. दररोज माझी सगळी चित्र पोर्टफोलियोतून काढून जमिनीवर मांडायचो. कधी ती उलटी-सुलटी ठेवून, तर कधी एक एक करून पाहायचो. त्यावरल्या प्रभावांचं मनाशी विश्लेषण करायचो. हे असं सातत्याने केल्यामुळे सरांचं म्हणणं हळूहळू मनात रिघायला लागलं. खरंच, चित्र आहेत, पण मी कुठे आहे त्यात, शिवाय किती आहे. कसं ओळखायचं स्वत:ला. काही कळायचं नाही. काय आहेत या शोधाचे निकष, ज्यांचे प्रभाव जाणवतात त्या चित्रकारांची चित्रे त्यांचीच वाटतात, ती कशामुळे इ.इ. प्रश्न मनात यायचे. त्या अथक प्रयासात डोकं, मन, बुद्धी, त्या अलीकडचे आणि पलीकडचे सारे दिगंत बधीर झाले. अत्यंत निराश झालो. हाती काही आलं नसलं तरी आपण चुकीचा मार्ग निवडला आहे, असं चुकूनही वाटलं नाही, ही त्या शोधातली जमेची बाजू. दरम्यान, जे मनापासून आवडतं तेच तू करतो आहेस, असं माझं मन मला सांगत राहिलं. मग त्या आवडीवरच लक्ष केंद्रित करून चिंतन करू लागलो आणि मनात प्रत्यन्तराची वीज चमकून गेली. वाटलं जे माझं होतं, ते माझ्यातच हरवलं होतं आणि मी ते बाहेर शोधत होतो. अभ्यास आणि व्यासंग यांमधील नातं आणि परस्परविरोधी दिशा लक्षात आल्या.
......
बरेच दिवस चित्रासंबंधी काहीच केलं नाही. त्याऐवजी गोनीदांची 'कुणा एकाची भ्रमणगाथा', पु. शि. रेगे यांची 'सावित्री', 'पुष्कळा' ही पुस्तकं वाचली. सिनेमे पाहिले. सोबत संगीत होतंच. मनावर कुठलंही ओझं न घेता मुंबईतच भरपूर प्रवास केला. थोडक्यात चित्र सोडून इतर सर्व काही केलं. आम्ही एक लॉन्ड्री चालवायला घेतली होती. तिथे बसू लागलो. त्यामुळे लोकांशी, कपड्यांशी संपर्क घडला, जो माझ्यासाठी नवा होता. त्यातून माझ्या चित्रात काय येणार होतं, माहीत नव्हतं. सगळं जगणं निश्चित-अनिश्चित नि विक्षिप्त होत चाललं होतं, परंतु मी स्वत:च्या आणि माझ्या चित्राच्या जवळ येत असल्याची आंतरिक जाणीव स्पष्ट होत होती.
ही आनंद व्यक्त करण्याची नव्हे, तर स्वत:ची परीक्षा घेण्याची वेळ होती हे लक्षात आलं आणि मी परीक्षेला बसलो. मीच परीक्षार्थी आणि मीच परीक्षक. शाळेत जे-जे शिकलो त्याचं मर्म लक्षात ठेऊन बाकीचं सर्व स्मृतीतून पुसून टाकण्याचा प्रयत्न चित्रातून जारी ठेवला, कारण तो निव्वळ अभ्यास होता. दिसणं, पाहणं, निरखणं आणि दृष्टीपटलावर बिम्बवणं ह्यातला मुलभूत भेद स्पष्ट करणारा. चित्राचे घटक आणि त्यांचं सृष्टीतल्या अनेकविध रूपांशी असणारं अंतस्थ, अदृश्य नातं सांगणारा. केवळ वरवरची वस्तुनिष्ठ यंत्रवत्, तांत्रिक कारागिरी आणखी सुधारून मला चित्रांतून मांडायची नव्हती. तर त्या अभ्यासाच्या जोरावर मनातल्या दृश्याविषयीच्या अदृश्य विचाराला त्यातल्या निखळ अनुबंधाला उत्स्फूर्तपणे आणि सहजपणे व्यक्त करायचं होतं. आशयाला रूप द्यायचं होतं. अनोळखी अनुभवांना ओळख देण्याची दुर्दम्य इच्छा होती. दृष्टीआड लपलेल्या सृष्टीला साकारणं हाच माझ्या सृजन-क्रियेचा केंद्रबिंदू आहे, हे तीव्रतेनं जाणवत होतं आणि म्हणूनच 'पाहून रंगवण्या ऐवजी, रंगवून पाहण्याची' जिगीषा मी अनुभवू इच्छित होतो. ह्या तीव्र इच्छेनेच मला एका अद्भुत वळणावर आणून उभं केलं होतं.
मला माझं चित्र सापडलं होतं, कारण मला मी सापडलो होतो. १९६८ साली शो-ची ऑफर देणाऱ्या केकूनी मला पुन्हा १९७८ साली विचारलं, त्यावेळीही मी त्यांना नकार दिला. कारण मी माझ्या 'फस्ट इम्प्रेशन' बद्दल अधिक जागरूक आणि जबाबदार झालो होतो. १९८३ साली मात्र मी माझं पहिलंवहिलं प्रदर्शन त्यांच्याच गॅलरीमध्ये भरवलं आणि कलाजगताने त्याचं स्वागत केलं. मला घडविणाऱ्या पळशीकरसरांनीच प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. खरंच माझ्या सरांनी त्या वेळी परखड उपदेश केला नसता, तर मी आज कुठे असतो? त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चाललो नसतो, तर माझ्या वैचारिक प्रवासाचं काय झालं असतं? मला माहीत आहे, मी असूनही नसतोच.
असं हे मूलभूत वळण घेऊन मी आता खूप पुढे निघून आलो आहे. खरं म्हणजे, दृश्य प्रवासात पुढे, मागे, वर, खाली असं काही नसतं. असतो फक्त स्वानुभव, प्रवाशाला समृद्ध करणारा. तो मला अनुभवता आला, सरांच्या सान्निध्यात, जीवनात आलेल्या वळणामुळे!
(Report courtesy महाराष्ट्र टाइम्स) Feb 2, 2014, 12.00AM
Wednesday 26 February 2014
THE TARA TRUST ART AUCTION 2014
PREVIEW SHOW:
Inauguration: 28th February – Friday – 5:00 PM IST
Preview Show Venue: Kala Academy, Campal, Panjim, Goa
Preview Show Dates: 28th February to 3rd March – 10:00 AM IST to 7:00 PM IST
AUCTION:
Inauguration: 8th March 2014 by the Governor of Goa, H.E. Shri Bharat
Vir Wanchoo
Auction Venue: Goa Marriott Resort & Spa, Miramar, Goa
Auction Date: 8th March 2014 – Saturday – 6:30 PM IST to 10:30 PM IST
The Tara Trust Art Auction is
planned and conceived as a Charity Fundraiser to enable Tara Trust raise funds
for their free weekly art workshops for underprivileged Children in Goa and
various other parts of India.
ART HEALS
With this motto in mind and
through this event, Tara Trust wants to raise awareness amongst the Art
Community, Artist Groups and Philanthropists in order to garner support for
their work.
Around 60 artists from Goa and
other parts of India have donated their works to the trust, either as a 100%
donation or on a 50%-50% share, to help the trust collect funds for their free
art workshops.
Subodh Kerkar, one of Goa’s
famous artists, along with Dr. Katharina Poggendorf-Kakar, Founder-Director of
Tara Trust, who is an artist, activist, writer herself, shall be curating the show.
Mr. Angira Arya, one of India’s best auctioneers is conducting the show, and
also bringing rare works of art from famous artists like Francis Newton Souza,
S. H. Raza, Jamini Roy, M.F. Husain for the auction. Some of the works that
shall be put on auction have never been seen in Goa before, as it is their
endeavor to also promote the arts and artists through this charity event.
This initiative is being
conceptualized with its sponsors and partners, to make it into an annual event
engaging India's artist community to the overall mission of the organization.
Their main event sponsor; Goa
Marriott Resort & Spa, is hosting and sponsoring the complete event, along
with the beverage partner, ABSOLUT. Tara
Trust, Opposite Holy Trinity Church, San Joao Holiday Homes, Mazilwaddo,
Benaulim, - 403716, Goa, India +91 8322770233 Icontact@taratrustindia.com www.taratrustindia.com
Kala Academy Goa has sponsored the preview Exhibition of the
works at their gallery space for 4 (four) days prior to the main auction event,
for public viewing.
Pragati
Offset, Hyderabad, has sponsored the printing of the catalogues for
distribution to the buyers.
The work of
fundraising post the main event will be continued by our partners Start Up Goa,
which is a fantastic Goa based platform, working with us to create our
online-catalogue and platform to highlight the works of the contributing
artists, long after the auction itself.
![]() | ||
(Francis Newton Souza) |
NAMES OF
ARTISTS WHO HAVE DONATED THEIR WORK
Alka Kalra,
Amit Lodh, Archana Mishra, Balu Sadalge, Chailati Morajkar, Francis Desouza,
Jagesh Ekkad, Kalidas Mhamal, Kanika Shah, Kedar Dhondu, Kunal Naik, Loretti
Pinto, Megha Joshi, Nirali Lal, Pradeep Naik, Praveen Naik, Rahul Chauhan, Raj
More, Raj Bhandare, Rajesh Salgaonkar, Rakesh Bani, Ramdas Gadekar, Ranit
Datta, Ritu Kamath, Rosy Da Silva, Sachin Naik, Sanjay Sawant, Santosh
Morajkar, SC Ahuja, Seby Akkara, Seema Kohli, Shilpa Nasnolkar, Siddharth
Goswami, Subodh Kerkar, Subrata Ghosh, Suhas Shilker, Sweety Joshi, Tathi
Premchand, Vijay Bhandare, Vitesh Naik, and many more to come.
![]() |
(Akbar Padamsee) |
ABOUT TARA
TRUST
Tara Trust is
a Goa based non-profit organization working in the area of education and
empowerment of underprivileged children. Established in 2008, the main
objective of the organization is to leverage the healing power of beauty and
art by bringing art based activities to underprivileged children.
Conceived of
by anthropologist Dr. Katharina Poggendorf-Kakar, Tara Trust's activities are
overseen by a board of directors including psychoanalyst Sudhir Kakar,
psychologist Amrita Narayanan, businessman Vikram Lal, writer Siddharth Dube
and philanthropist Shefali Malhoutra. The management and work is conducted by a
team of very well qualified employees and volunteers.
Today, they
reach out to 320 children on a weekly basis in Goa, conducting 15 weekly
workshops across Goa all of which are offered free of cost. They reach out to
another 1000 children annually through special workshops and programs. At the
end of 2013, through their weekly workshops, special programs and the art
camps, they successfully conducted 1,055 workshops having spent nearly 4,220
man-hours behind these workshops with a four-member-team and periodic
volunteers, since the beginning of Tara Trust. Tara Trust, Opposite Holy Trinity Church, San Joao
Holiday Homes, Mazilwaddo, Benaulim, - 403716, Goa, India +91
8322770233 contact@taratrustindia.com www.taratrustindia.com
(Advertisement )
Saturday 22 February 2014
Vinita Dasgupta, 30
A large figurative portrait of a frail, distraught-looking lady set against the backdrop of Pattachitra paintings from Raghurajpur in Odisha adorns the wall at artist Vinita Dasgupta’s first solo show titled Storytellers. Although all her works on display were sold out, this is one piece that Dasgupta says she will never sell. “This is a portrait of my dida (grandmother) and she is my storyteller,” says the 30-year-old artist.
The series of paintings depicts a new pictorial style and artistic
practice that she developed three years ago after visiting Raghurajpur.
Although the village is known for its heritage of Pattachitra paintings
that date back to 5 BC, to the artist,
it is a cradle of early childhood memories and stories that her
grandmother used to tell her. Much like the Pattachitra paintings that
depict tales from Hindu mythology in a pictorial form, her grandmother
too would narrate mythological stories and folk tales. As Dasgupta grew
up and graduated from Delhi College of Arts, the memories of Raghurajpur
faded, but not the influence of her grandmother, who continues to be an
inspiration for her work.
“The biggest strength of a woman is her power to love,” says the artist.
“And it starts with the ability to love oneself.” That’s one of the
lessons that her mother and her grandmother taught her. No wonder
Dasgupta’s early works have a deeply autobiographical touch. She used
self-portraits to create metaphors of herself and her realisation of
womanhood. These early works are characterised by broad, free-flowing
brush strokes. “Here was a woman who painted like a man and that is what
drew me to her work,” says curator Rahul Bhattacharya. “But that style
comes naturally to her.” And she never changes her style until she gets
bored of it.
Although a personal connect with Raghurajpur drew her to the village
at first, the craftsmanship, detailing and precision of the folk
painters inspired her to incorporate elements of their work into hers.
“It was these artists who helped me realise that something ‘popular’
could also be deeply rooted in discipline and have a strong cultural
dialogue,” she says. Since then, Dasgupta has adopted a more controlled
technique and introduced new compositional elements in her work.
![]() |
Artist : Vinita Dasgupta Photo: Vijay Pandey |
Although initially she transposed motifs from the village onto the
borders of paintings depicting popular personalities, they are now
deeply entrenched in her artwork. For her latest series, the artist
has painted Pattachitrakathas on small pieces of canvas, rolled them to
create small scrolls and used them to create an intricate detailing in
her latest series of portraits. “I have seen Vinita sitting in the
corner making canvas rolls for hours together,” says Bhattacharya, who
feels that Dasgupta’s drive to create art combined with her fidgetiness converts her art
into a meditative practice. “What makes her work unique is that it is
contemporary, yet embodies our heritage in the form of scrolls,” says artist Niladri Paul.
Although Dasgupta has never had trouble selling her work, the
detailing in her work is time-consuming; a single piece of work can take
her up to three months to complete. Her works can be bought for Rs 1-5
lakh. Though there are times when she has to struggle to make ends meet,
that is about to change with her first solo show being a runaway hit.
Perhaps she can now put her energies into refining her work.
(Report courtesy Published in Tehelka Magazine, Volume 11 Issue 7, Dated 15 February 2014)
Re telling a story teller:
Yet the search
continued, she discovered that to work with popular imagery she needed to
re-present them with greater conceptual layering. The gestural modernist within her can only be
deconstructed through a practice connected with tradition and discipline. Her
(re) discovery of Raghurajpur folk painting tradition finally leadsto this search
finding a resting place from where she can explore future directions. How do
craft, storytelling and meditative practice become carriers of contemporary
concepts? This body of work ‘The Story Tellers’ marks an
important turning point in her journey, specially reflecting a sustained
engagement with technique, inspiration and concept.
Odishahas been a part of
the artist’s childhood, and that nostalgia has played an important role in
Dasgupta being able to culturally respond to it’s artistic tradition. The
Raghurajpur folk painting tradition also offered her adifferent access to the
‘popular’, a ‘popular’ that was deeplyentrenched in a disciplined and controlled
approach to art. This art making is robust, colorful and yet deeply in dialogue
with the culture of contemporaneity. The philosophy of craftsmanship attracted
her deeply along with its notions of detailing, precision and the ‘handmade’. Moreover,
Raghurajpur offered her an escape from the noise of mainstream popular culture
as well as an alternative understanding of the narrative possibilities of art
making. Since her (re) visit to Raghurajpur about three years ago, newer pictorial
style and artistic practice slowly began to find space in her works. Initially
it was just motifs coming into the borders of her paintings depicting Bollywood
and popular personalities...and slowly it entered deep, deep into the artwork
itself.
The encounter with
Raghurajpur did not lead her throw away her personal love for the urban popular
traditions, instead what resulted is a complex layering of both. Taking
photographs of the Raghurajpur paintings,the artist painstakinglymakesnumerous
canvas rolls and usesthem to make portraits of painters, performers and story
tellersto make her world. Paint is given at a final layer of detailing that
helps the artist to develop a language that challenges the boundaries of
painting. This merging of boundaries makes her a child of postmodern
eclecticism and also gives her meditative therapy of craftmanship that her soul
has been looking for.
Apart from the artist’s
natural flair for figuration and an ability to strike a chord with portraiture, what makes her current body of works significant
is the possibilities of enquiries that they open and the complex layering of
folk and urban they embody. This layering of folk and urban also mirrors the
zone between art and craft that mark the physicality of her works. The inspiration
behind these rolls has been earrings she discovered where in Coke and Fanta
cans were cut and rolled. This dismembering and creation of a new identity
opened up the possibilities for Dasgupta to assimilate the Raghurajpur
paintings into her works and yet mask them. Over the last two years apart from
the painters and performers of Raghurajpur, other prominent personalities have
come in her artworks...almost as a continuation of her earlier subject matter.
However even though sometimes these popular mainstream icons enter her work,
their representation has completely changed. There is a fragmentation and
realignment that happens, this breaks their iconicity and positions them within
the vulnerability
of popular storytelling.
As
she moves deeper into understanding and practicing this direction in her
practice, she is also beginning to realize that within this idiom there is a
great possibility of conceptual fine-tuning and experimentation. These works
have captured the imagination of viewers, yet the artist is looking for more, eager
to walk a tightrope between making her practice more deeply personal, and
universal. The journey is to entrench her works deep into the dialog of
contemporary, yet go deeper into her love for craft and the handmade. The
Storytellers is standing on the edge, rooted and yet ready to take off.
Rahul
Bhattacharya
Curator
and Writer
Subscribe to:
Posts (Atom)